Saturday 21 March 2015

संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण वगैरे

संमेलनाच्या अध्य़क्षाचं भाषण देताना मी. सोबत विचारपीठावर महेश थोरवे
श्रीपाल सबनीस, हरि नरके, विनोद शिरसाठ आणि भूषण कदम
कधी कोणत्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. कोणी परिसंवादासाठी वगैरे बोलावलं तरी मिळवलं, असं अजूनही वाटतं. तरीही माझासारखा पत्रकार पहिल्या अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनला. आयोजकांशी माझी ओळखदेख नव्हती, तरीही. दोन दिवसांचा हा अनुभव समृद्ध करून जाणारा होता. अनेक नवे मित्र जोडले. नवं ऐकता आलं. समजून घेता आलं. स्वतःला दुरुस्त करून घेता आलं. त्यात माझाही पीआर वगैरे झाला.

संमेलन सुरू असताना माझ्याशी फोनवर बोलताना आई म्हणाली की माणसं आहेत, म्हणजे तुझं पोट भरलं असेल. मी अध्यक्ष म्हणून हरि नरके सर मुद्दामून भाषण ऐकण्यासाठी आले होते. मला पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून पाहणारे पराग पाटील आणि सुनील कर्णिक मुंबईहून आले होते. सोबत नारायण बांदेकरही होते. आमचे दत्ताभाऊ बाळसराफ मुंबईहून आले.