Monday 31 January 2011

मुंबईचे भय्ये


परवा घरी हळदीकुंकू होतं. मोग-याचे गजरे आणायचे होते. त्यासाठी ऑफिस सुटल्यावर दादर गाठलं. श्रीरंगच्या बाईकची सोबत होती. गजरे बनत होते. श्रीरंग म्हणाला आईस्क्रीम खाऊया. मला सर्दी होती. तेवढ्यातच मला समोरून एक नत्थुलालसारख्या मिशांचा माणूस दिसला. मला आठवलं. तू मुछवाला महादेव बघितलायस, मी श्रीरंगला विचारलं. चल, गरम दूध पिऊया, मी त्याला कबुतरखान्याच्या कोप-यावर घेऊन आलो.

दुकानाचं नाव नाही लक्षात राहत. पण लहानपणापासून मी ते दुकान बघतोय. मध्यंतरी चहाशिवाय करमायचं नाही, म्हणून चहा कॉफी सोडली होती. तेव्हा दादरमधे आल्यावर दूध आणि जिलेबी खायला प्यायला तिथेच जायचो. तेव्हा गल्ल्यावर बसणारे काका आता हारवाल्या फोटोफ्रेममधे गेलेत. त्यांच्याच शेजारी जुन्या जमान्यातला शंकर महादेवाचा फोटो आहे. चेह-यावर फार काही तेज नसलेल्या साध्या माणसाच्या चेह-यातला आपला वाटणारा महादेव आहे त्यात. त्याला छान मिशापण आहेत. बाजुलाच रविवर्मा, मुळगावकर यांच्या प्रभावातला शंकर पार्वतीचाही फोटो आहे. त्यातले शंकर अगदी क्लिन शेव्ड आणि मस्त डोले शोले बिल्टवाले आहेत. महादेव ते शंकर असं ट्रान्झिशन तिथं अगदी समोर दिसतं.

Sunday 30 January 2011

जय शिवभीम!

कुणाही धर्माने हिंदू असलेल्याला विचारावं, तुझा कुणी मुसलमान मित्र आहे का? उत्तर हो येतंच. त्याला पुढे विचारावं, कसा आहे तो? उत्तर येतं, चांगला, मेहनती, विश्वासू, सुसंस्कृत वगैरे. दुसरा कुणी मुसलमान दोस्त आहे का? उत्तर येतं, हो आहे. तोही चांगला असतो. असं आणखी दोन चारदा विचारूनही उत्तर तेच येतं. मग विचारावं, मुसलमान कसे असतात? उत्तर येतं, आक्रमक, विश्वासघातकी, असंस्कृत, वाईट वगैरे
.
तसंच कुणा धर्माने मुसलमान असलेल्याला विचारलं की हिंदूंबद्दल अशीच उत्तरं येतात.

Tuesday 25 January 2011

बच्चू कडूंचं काय चुकलं?

मोठा गॅप झालाय. गेले नऊ दिवस नवा ब्लॉग टाकलेला नाही. थोडा गडबडीत होतो. हा उपास तोडायचा असं रोज ठरवायचो. जुळून येत नव्हतं. आज ठरवलेलंच. गेल्या आठवडयात हा लेख लिहिला होता. नवशक्तित छापूनही आला होता. विषय होता बच्चू कडू. 

मला वाटतं २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी पहिल्यांदा बच्चू कडूंचं नाव ऐकलं. त्याच्या प्रचाराचा धुमाकूळ एवढा होता की इथे मुंबईत त्याचे पडसाद ऐकायला मिळत होते. एखादा अपक्ष उमेदवारासाठी, तेही लोकसभेच्या निवडणुकीत असं घडणं, ही मोठीच गोष्ट. पुढे बच्चूभाऊची भाषणं विधानसभेत ऐकली. तिथे विझलेल्या लोकांच्या गर्दीत आगीची धग लक्ष वेधून घ्यायची.

Monday 17 January 2011

निमित्त संक्रांतः सध्याच्या राजकीय संक्रमणांविषयी

सदराची भूक खूप असते. दर आठवड्याला काहितरी द्यावंच लागतं. कधीतरी काही सूचत नसतं. विषय असतात पण त्यावर थोडाफार हवा तेवढा तरी अभ्यास करायला वेळ नसतो. मूड नसतो. दुसरी अधिक महत्त्वाची कामं असतात. अशावेळेस पाटी टाकावी लागते. तो कामाचा भाग असतो. पण ती पाटीपण थोडी नीट टाकायला हवी.

पाटी टाकलेले दोन लेख आठवताहेत. एक मुंबईतल्या थंडीवर लिहिलेला. हा लेख लिहिण्याआधी काही तासच आधी राडिया आणि मीडियावर एक लेख लिहिला होता. त्यामुळे वेळेची आणि जागेची गरज म्हणून एक लेख नवशक्तिला लिहून पाठवला. तसंच परवा शुक्रवारीही झालं. असीमानंदाच्या कबुलीजबाबावर लेख लिहिल्यावर लगेचच काही तासांत लेख लिहायचा होता.

Friday 14 January 2011

संक्रांतीचा उत्सव रोजच्या रोज



नवशक्तित ‘समकालीन’ हा कॉलम लिहायला लागल्याला एक वर्षं झालं. दर आठवड्याला हजारेक शब्दांचा लेख लिहिणं, हे काम माझ्यासारख्या आळशी माणसासाठी जास्तच जिकिरीचं होतं. पण हा एक वर्षाचा प्रवास आनंदाचा गेला. वेगवेगळे विषय हाताळायला मिळाले. हात लिहिता राहिला. नव्या विषयांचा अभ्यास झाला. नव्या माणसांशी ओळखी झाल्या. आणखी काय हवं?


मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड सुरू होता. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक महेश म्हात्रेंचा फोन आला. आमच्याकडे आठवड्याला कॉलम लिहिशील का, त्यांनी विचारलं. पहिल्या लेखाच्या इण्ट्रोत त्यांनी लिहिलं होतं, ‘मुंबई आणि सर्वच महानगरांना एक संस्कृती असते. ही संस्कृती त्या शहरातील समाजजीवनाचे दर्शन घडवत असते. जसा काळ बदलतो, तशी शहरे आणि त्यांची संस्कृतीही कात टाकते. या बदलांचा आढावा घेणारे, व्यासंगी पत्रकार सचिन परब यांचे हे नवे कोरे सदर.’ वाचून बरं वाटलं. व्यासंगी वगैरे म्हटल्यावर मूठभर मास चढलं.

Saturday 8 January 2011

मराठीत इंग्रजी यायलाच हवी!

आपण रोज मराठी बोलताना जे इंग्रजी शब्द वापरतो तेही आपल्याला लिहिताना खुपतात. जे बोलतो ते लिहिलं नाही, तर भाषा संपत जाते. आपण तेच करत आहोत. इंग्रजी आपल्याला स्वीकारावंच लागेल. मराठी भाषेने आपल्या प्रवासात असं कितीतरी भाषांना स्वीकारलंय. त्यामुळे आपण मराठी लिहिताना इंग्रजी शब्द वापरतो, हे मराठी संस्कृतीच्या, मराठी भाषेच्या भल्याचं काम करत आहोत. त्यासाठी कोणताही अपराधगंड डोक्यात बाळगायला नको. ठाण्याच्या साहित्य संमेलनातला एक ठराव मराठी मीडियाला मराठीचं मराठीपण हरवण्यासाठी दोषी ठरवतो. त्याला म्हणूनच मुळातून विरोध करायला हवा.

Tuesday 4 January 2011

मिलिंद नार्वेकरविषयी

नीलमताई गो-हे आता फार आदर्शवादाच्या चर्चा आणि गप्पा करू शकणार नाहीत. कारण मिलिंद नार्वेकरांचा आदेश. त्यांचं फोनवरचं संभाषण समोर आलं आणि मिलिंद नार्वेकर हे नाव पुन्हा चर्चेत आलं. मिलिंदवरचा एक जुना लेख ब्लॉगवर टाकण्यासाठी हे निमित्त पुरेसं असावं. मुंबई टाइम्समधे असताना सुहास फडके सरांनी मटा ऑनलाईनसाठी खास हा लेख लिहून घेतला होता.

त्या मूळ लेखाचा इण्ट्रो असा होता. प्रत्येक निवडणूक जवळ आली की मिलिंद नार्वेकर या नावाची चर्चा होते. यावेळीही शिवसेनेचे औरंगाबादेतले बंडखोर माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या आरोपांमुळे नार्वेकर गाजले. पण हे नार्वेकर कोण आहेत ? ते मातोश्रीपर्यंत पोहोचले कसे ? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. एका अनिल सावे या अमेरिकेत राहणा-या महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमच्या वाचकानं आपल्या एका बातमीतवरच्या प्रतिक्रियेत हे प्रश्न विचारलेत. त्या प्रश्नांचं हे उत्तरं ...

Monday 3 January 2011

माझा बोललेला ब्लॉग

मी मराठीच्या बुलेटिनमधे बोललेला हा माझा एक ब्लॉगच. ठाण्याच्या साहित्य संमेलनात नथुराम गोडसेचा आदराने झालेला उल्लेख कळल्यावर आग डोक्यात गेली. थोडंफार बोललो. ते सोबत जोडलंय.





हॅपी न्यू इयर

एक माझा मित्र आहे, निनाद नावाचा. तो फ्रीलान्स पत्रकार आहे आणि चांगला इवेंट मॅनेजरही. भरपूर बोलतो, बडबडतो. मी मुंबई टाइम्सचा प्रमुख असताना तो तिथे नव्याने लिहायला लागला. त्यासाठी त्याने फोन केला होता. सगळं बोलून झाल्यावर त्यानं सांगितलं तुमचा एक लेख मी लॅमिनेट करून माझ्या ऑफिसातल्या डेस्कवर लावलाय. खरं खोटं निनाद जाणे. लेखाचं नाव होतं, 'हकुना मटाटा'.